मुंबई, दि.१८(पीसीबी) – कोरोनानंतर नाले सफाई घोटाळा धारावीला व मुंबईला बुडवणार असुन ठाकरे सरकार ची नालेसफाई फक्त कागदावरच, असं ट्विट करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
कोरोनानंतर नाले सफाई घोटाळा धारावीला मुंबईला बुडवणार असल्याची टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. तसंच ठाकरे सरकारची नालेसफाई फक्त कागदावरच असल्याची टीका त्यांनी केलीये. त्यांनी मिठी नदीच्या नाल्याच्या व्हीडिओ ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबईच्या नाले सफाईवरून विरोधक आणि मुंबई महापालिकेमध्ये प्रत्येक पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर जुंपलेली असते. याही वर्षी नाले सफाईच्या कामाला सुरूवात होताच सोमय्यांनी सेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला लक्ष्य केलं आहे.
Thackeray Sarkar NaleSafai only on Paper! How much "Kachra" removed? How When Where transported? See Dharavi Video
कोरोना नंतर "नाला" सफाई घोटाळा बुडविणार धारावी ला, मुंबईला. सोबत चा व्हिडिओ प्रेमनगर/मिठी नदी नाला चा आहे. ठाकरे सरकार ची नालेसफाई आहे फक्त कागदावर @Dev_Fadnavis pic.twitter.com/NzEwHQMQyW
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 18, 2020