यवतमाळ, दि. ६ (पीसीबी) – काँग्रेस नेते व प्रचार प्रमुख नाना पाटोले यांना गांभीर्याने घेत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेनिमित्त यवतमाळमध्ये आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात पूरपरिस्थिती बिकट झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फाईव्ह स्टार महाजनादेश यात्रा काढत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. या टीकेला नाना पाटोले यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, आम्ही पाच वर्षात जितकी कामे केली. तितकी आघाडी सरकारने १५ वर्षांत केली नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावर उत्तर देताना एका व्यासपीठावर या तुम्ही काय केले, अन् आम्ही काय केले याचा लेखाजोखा मांडू, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.