नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेससह काही पक्ष विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत – अमित शहा

0
683

नवी दिल्ली,दि.१७(पीसीबी) – नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून हिंसाचाराच्या या आंदोलनात अग्रभागी असलेल्या विद्यार्थी वर्गाला उद्देशून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर आवाहन केलं आहे. या कायद्यावरून काँग्रेससह काही पक्ष तुमची दिशाभूल करत आहेत, असं सांगत विद्यार्थ्यांना वेळीच सावध होण्याचा सल्लाही अमित शहा यांनी दिला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा देशातील विद्यार्थी वर्ग आणि तरुणांनी अभ्यास करावा. हा कायदा काय आहे, हे जाणून घ्यावे, असे आवाहन अमित शहा यांनी केले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद नसल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं आहे.

नागरिकत्व कायद्याबाबत काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस तुमची सर्वांची दिशाभूल करत आहेत आणि देशात हिंसाचाराला खतपाणी घालत आहेत, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.