मुंबई,दि.८(पीसीबी) – हाथरसमधील मुलीवर झालेल्या बलात्कारावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. देशातील तरुण मुलं हैवानाचं रुप घेत असल्याचं तिने म्हटलंय. तनुश्री म्हणते, हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यामागील मूळ कारण आपण शोधायला हवं. देशातील तरुण वर्ग आणि मुलांमध्ये राक्षसीवृत्ती का वाढतेय याबाबत आपण विचार करायला हवा.
तसंच देशातील बलात्काराच्या घटनांसाठी एक समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच इतक्या गंभीर प्रकरणाचा काही जणं त्यांच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी आणि राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप तनुश्रीने केला.