थेरगावमध्ये पाच लाखांसाठी सासरकडच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ

698

थेरगाव, दि. २१ (पीसीबी) – माहेरुन पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासरकडच्या मंडळींनी एका २५ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ८ मे २०१६ ते १२ ऑक्टोबर २०१७ दरम्यान घडली.

याप्रकरणी पीडित २५ वर्षीय विवाहितेने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार  सचिन किसनराव कणसे, विद्या किसनराव कणसे, सुप्रिया स्वप्नील मोरे, स्वप्नील सुभाष मोरे, रविंद्र नारायण कणसे, राजेंद्र नारायण कणसे (सर्व रा. ७१३, वर्धमान, व्दारीका क्रांतीनगर, थेरगाव) या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय महिलेचा सचिनसोबत २०१६ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर ८ मे २०१६ ते १२ ऑक्टोबर २०१७ दरम्यान पतीसह सासरकडच्या मंडळींनी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये, अशी वारंवार मागणी करुन महिलेला शिवीगाळ करुन शारिरीक आणि मानसिक त्रास दिला. याप्रकरणी पीडितेने पती सचिन कणसेसह, विद्या कणसे, सुप्रिया मोरे, स्वप्नील मोरे, रविंद्र कणसे, राजेंद्र  कणसे यांच्याविरोधात वाकड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.