…त्याप्रमाणे आरक्षणसुद्धा एका रात्रीत काढतील – जितेंद्र आव्हाड  

0
439

लातूर, दि. २६ (पीसीबी) – सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणाविषयीच्या   विधानाचा अर्थ काय काढायचा?, असा सवाल करून एका रात्रीत ३७० कलम काढून टाकले. त्याप्रमाणे आरक्षणसुद्धा एका रात्रीत काढले जाईल. या सरकारचा काही नेम नाही,  अशी  भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी व्यक्त केली आहे.

लातूरात  लिंगायत समाजाचे राज्यव्यापी आरक्षण अधिवेशन नुकतेच झाले. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.

आव्हाड म्हणाले की,  आरक्षणाच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण, हे समाजाने ओळखायला हवे. आम्हाला आरक्षण मिळालेच पाहीजे, असे लिंगायत समाजाने सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले पाहिजे.   सरकार या समाजाच्या  प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. आघाडीला  सत्ता मिळाल्यास  हा प्रश्न  सोडवू, असे आव्हाड यांनी सांगितले.