…तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी  

0
773

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आम्ही मोदी सरकारला भाग पाडू, असे सांगून कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत मोदी सरकारला झोपू देणार नाही, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला आहे. दरम्यान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडध्ये सत्ता मिळताच  राहुल गांधींनी आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफीची  घोषणा केली आहे. 

मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांचे एक रुपयाचे कर्ज माफ केलेले नाही. आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन कर्जमाफीची मागणी करु. शेतकऱ्यांना हा देश तुमचा आहे. कोणा करोडपतींचा नाही. तुमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही तुमचा आवाज पोहोचवण्याचे काम करत आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले.

नोटाबंदी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. देशातील शेतकरी आणि छोट्या उद्योजकांना लुटण्यात आले,  असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. कर्जमाफी शक्य असल्याचे सांगून आम्ही फक्त सहा तासांत दोन राज्यात केली आहे. आता  तिसऱ्या राज्यात लवकरच करणार आहोत, असे राहुल गांधींनी सांगितले.