जे लोकं मातोश्रीबाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले – देवेंद्र फडणवीस

0
752

मुंबई,दि.२६(पीसीबी) – जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मी राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

जनतेने भाजपला जनादेश दिला, कारण आम्ही ७० टक्के जागा जिंकलो. तर शिवसेनेला केवळ ४० टक्के जागांवर विजय मिळाला होता. मात्र न ठरलेल्य़ा गोष्टींचा बाऊ करून शिवसेनेनं भाजपला धमकी दिली, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आमच्याकडे बहुमत नसल्याने मी राजीनामा देत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मी ५ वर्षं केलेल्या कामाचं मला समाधान आहे. आज राजीनामा देताना मला समाधान वाटतंय, पण काही गोष्टी राहून गेल्याचं दुःख आहे. मी जनतेचे मनापासून आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.