जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाया मरत नाही – अजित पवार

0
560

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – महाविकास आघाडी मध्ये गृहमंत्रिपदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तसेच राज्यात ठाकरे सरकार येऊन २० दिवस उलटून गेले आहेत. अखेर मंत्रीमंडळ मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

‘उद्धव ठाकरेंनी ठरवावे काय करावे, पण खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलंय, म्हणून माझे व्यक्तिशः प्रेम आहे त्यांच्यावर. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला देऊ नका. ओ, काहीच ठेवत नाही तुम्ही हातामध्ये. गृहमंत्र्यांकडे सगळं असतं. तुम्ही सगळंच देऊन टाकले गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिल, तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांचा खास पवारांच्या शैलीत समाचार घेतला आहे. हातची सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे दुःख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाया मरत नाही, असा टोला अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.