जात, धर्म, प्रांत भेद विसरुन नवीन महाराष्ट्र घडवूया – अजित पवार

0
667

मुंबई,दि.१(पीसीबी) – आलेलं नवीन वर्ष हे ‘ट्वेंटी ट्वेंटी’ वर्ष आहे. क्रिकेटमध्ये ‘ट्वेंटी ट्वेंटी’चा सामना हा अतिशय जोरकस होत असतो. तशाच प्रकारे बेरोजगारी, शेतकरी आणि महिलांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न करु, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देत म्हटलं आहे.

महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखताना आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक आघाडीवरही राज्याची घोडदौड कायम राहावी, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करुया. जात, धर्म, प्रांत असे सगळे भेद विसरुन नवीन महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन अजित पवार केलं आहे.

राज्यातील समस्त जनतेला समृद्ध, प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुट होण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. हे वर्ष राज्यातील जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी, घेऊन येईल. शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनींच्या जीवनात आनंद निर्माण करेल, असा विश्वास अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.