गरम पाण्यात लिंबू घालून पाणी प्यायल्याने करोनापासून बचाव होऊ शकतो

0
334
मुंबई, दि.६ (बीपीसी) – अभिनेते प्रकाश राज यांनी त्याच्या ट्विटमध्ये एक कप गरम पाण्यात लिंबू घालून ते पाणी प्यायल्याने करोनापासून बचाव होऊ शकतो असे ट्विटमध्ये म्हटले होते. पण काही वेळातच त्यांनी त्याचे हे ट्विट डिलिट केले.

प्रकाश यांनी आणखी एक ट्विट केले. ‘एखादे चांगले काम करण्याच्या नादात मी चुकीच्या माहितीचा शिकार झालो. पण चांगली गोष्ट ही आहे की माझी चूक सुधारली आहे. त्यामुळे मी चुकीचे ट्विट डिलिट केले आहे’ असे प्रकाश यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले.