मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कुणीही पत्राला उत्तर दिलं नाही – अण्णा हजारे

0
443

अहमदनगर,दि.६(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कुणीही पत्राला उत्तर दिलं नाही, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. माहितीच्या अधिकाराप्रमाणे सशक्त लोकायुक्त कायदा मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळं तो लवकरात लवकर करावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मी येत्या विधानसभेत मसुदा ठेवून कायदा करावा यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे एक पत्र सोडता कोणाचेही पत्र आले नाही, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा करावा यासाठी अण्णा हजारे प्रयत्नशील आहेत. यासंबंधी त्यांनी वेळोवेळी सरकारशी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, पूर्वीच्या सरकारने आश्वासन दिलेला लोकायुक्त कायदा अद्याप झालेला नाही. अण्णा यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांशी यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे.