‘कोर्टाची लढाई मला नवीन नाहीये’,असं म्हणणाऱ्या संजय राऊतांवर कोर्टात तब्बल ‘एवढे’ खटले सुरु आहेत; स्वतःच दिलं स्पष्टीकरण

0
236

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : शिवसेना आणि कंगना रनौत हा वाद सर्व परिचय आहे. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर फिरवल्यानंतर आता कंगना रणौतने शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. मात्र, या खटल्यामध्ये प्रतिवादी करण्याची मागणी हास्यास्पद असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याचबरोबर “आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत, मला कोर्टाची लढाई माझ्यासाठी नवी नाही.” अस वक्रव्य राऊतांनी केलं आहे. परंतु, कंनगा रणौत यांच्या वकीलांच्या मते संजय राऊत यांच्यामुळे बीएमसीला कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करावी लागलेली आहे.

एवढेच नाही तर ड्रग्सप्रकरणी संशयाच्या सूईत अडकलेली अभिनेत्री दिपीका पदुकोण आणि राजकीय आखाड्यात उतरण्यास तयार झालेले बिहारचे डीजीपी यासह अनेक मुद्यांवर राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अंदाजात भाष्यं केलं आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले कि, “आम्ही कोणतीही लढाई लढायला तयार आहोत. कोर्टाची लढाई मला नवीन आहे का? १६० खटले माझ्यावर सुरू होते. महाराष्ट्रातील असं कोणतही कोर्ट नाही जिथं संजय राऊतवर केस पडली नाही.१९९२ ची दंगल, बाबरी प्रकरण, मराठी माणसांच्या लढ्यामध्ये आंदोलन आणि संघर्ष हा आमचा आत्मा आहे. कोर्ट-कचेऱ्या ह्या होतचं असतात.”