कोणी कोणाला अल्टीमेटम देऊन आघाडी होत नाही; वडेट्टीवारांचा आंबेडकरांना टोला

0
370

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – कोणी कोणाला अल्टीमेटम देऊन आघाडी होत नाही, असा टोला काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे.

आम्हाला सांगावे चर्चेसाठी या आम्ही जाऊ त्यांनी फॉर्म्युला सांगावा. हे न करता, इतक्या जागा देतो, तारीख देतो यातून आघाडीची लक्षण दिसत नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

आंबेडकर हे आघाडी करण्यासाठी अटी घालतील. राष्ट्रवादी काँग्रेस नको म्हणतील. ते जर सकारात्मक असतील तर त्यांनी आघाडीसाठी चर्चेला यावे असे, आवाहन देखील त्यांनी आंबेडकरांना केले आहे.