कोणी कितीही प्रयत्न केला, तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे शक्य नाही – संजय राऊत

0
428

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करु शकत नाहीत. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे शक्य नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना १०० चा आकडा पार करेल, तर महायुती २०० चा आकडा पार करेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.   

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाला एकमेकांशिवाय पर्याय नाही. शिवसेनेशिवाय भाजपा राज्य करु शकत नाही. भाजपाला जास्त जागा मिळतील, हे मान्य करायला काही हरकत नाही. पण जागा जास्त मिळाल्या तरी तरी महाराष्ट्रात शिवसेनेचे महत्त्व कमी होणार नाही,  असे   राऊत यांनी सांगितले.

उद्या निकाल लागणारच आहे, मग अंदाज कशाला लावत बसायचा असे सांगून आर आर पाटील यांनी मटका लावणे कधीच बंद केले आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच राजकारण्यांना एखाद्या आकड्यावर टिकून राहणे शोभत नाही, असेही  ते म्हणाले.  उद्याच्या निकालानंतर शिवसेना काय आहे,  ते कळेल , असे सूचक विधानही त्यांनी केले.