किती डास मेले, हे मोजत बसायचे का ? परराष्ट्र राज्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक सवाल  

0
624

नवी दिल्ली, दि.६ (पीसीबी) – रात्री ३.३० वाजता खूप डास होते. मग मी हिट स्प्रे मारला. आता त्यानंतर मी किती डास मेले, हे मोजत बसायचे का ?  असा खोचक  सवाल परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी  विरोधकांना के ला आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. यावरून विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले. याबाबत सरकारने माहिती जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. यावर व्ही.के.सिंह यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, व्ही.के. सिंह यांनी पुलवामा हल्ल्याविषयी वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावरही निशाणा साधला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या दुर्घटना होती की दहशतवादी घटना? याचे उत्तर दिग्विजय सिंह यांनी द्यावे. त्यानंतर आपण पुलवामा हल्ल्यावर भाष्य करू, असा टोलाही व्ही.के सिंह यांनी लगावला .