मुंबई, दि. २५ (पीसीबी) – काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्हाला निरोप येत आहे. मात्र, आम्ही मोदींसोबत राहणार आहोत, असे आरपीआय नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (सोमवार) स्पष्ट केले आहे.
माझे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत. याचा अर्थ आम्हाला वाऱ्यावर सोडा, असा होत नाही. युती झाली तेव्हा आम्हाला चर्चेत सहभागी करून घ्यायला पाहिजे होते, अशा शब्दांत आठवले यांनी युतीबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
युतीमध्ये दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन्ही पैकी एक लोकसभेची जागा मिळावी, अशी आमची मागणी आहे, असे आठवले यांनी सांगितले. त्याचबरोबर लातूर, रामटेक, सोलापूर यापैकी एका जागेची मागणी आहे. साताऱ्याची जागा आम्हाला नको, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.