काँग्रेसला ५० वर्षे दिली, भाजपला आणखी ५ वर्षे देऊन बघूया – उध्दव ठाकरे

0
608

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – काँग्रेस पक्षाला  ५० वर्ष सत्ता दिली. आता भाजपला आणखी ५ वर्ष देऊन पाहूयात, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या  कार्यक्रमात ते बोलत होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो असतो, आणि कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर काँग्रेससोबत जाणे शक्य नव्हते,  त्यामुळेच शिवसेनेने भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जसे वातावरण होते, तसे वातावरण सध्या नाही. सर्वजण भाजपच्या विरोधात आहेत.  मात्र, जनतेच्या भल्यासाठी आम्ही भाजपसोबत युती करण्यास तयार झालो आहोत, असेही ते म्हणाले.   काँग्रेसकडे देश गेला असता, तर हिंदुत्व आणि इतर गोष्टीही मागे पडल्या असत्या, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.