काँग्रेसकडून सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार; प्रकाश आंबेडकरांचा लेटरबॉम्ब

0
569

अकोला, दि. ४ (पीसीबी) –  राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबधी काँग्रेसकडून आघाडीच्या लेखी पत्राला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्राद्वारेच उत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी चार पानी पत्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून काँग्रेसला लिहिले आहे. या पत्रात प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

काँग्रेसने काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत सामील होण्याबाबत लेखी प्रस्ताव दिला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंबेडकरांना प्रत्यक्ष हा लेखी प्रस्ताव दिला होता.

प्रकाश आंबेडकरांनी या प्रस्तावावर चार पानी पत्राद्वारे उत्तर देत काँग्रेसच्या आघाडीच्या हेतूवरच संशय व्यक्त केला. काँग्रेसने वारंवार आपली भूमिका बदलल्याचा आरोप आंबेडकरांनी आपल्या पत्रातून केला आहे. काँग्रेस आता सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करीत  आहे, असा आरोप आंबेडकरांनी पत्रातून केला आहे.