ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत एमआयएमसोबत युती कायम – प्रकाश आंबेडकर

0
402

नागपूर, दि. ८ (पीसीबी) – ‘आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही ओवेसी यांच्यासोबत झाली आहे, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत युती कायम असल्याचे म्हटले आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी याविषयी जोपर्यंत काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची युती कायम असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्याआधी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी त्याबाबत घोषणा केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी खासदार ओवैसी सांगत नाहीत तोपर्यंत आमची युती कायम असल्याचे म्हटले आहे. “आमची युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि आता ओवेसी यांच्याकडे निरोप घेऊन गेली आहेत”, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यातील आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील संघर्ष परत एकदा समोर आला आहे.

‘वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच घेतला असल्याचे इम्तियाज जलील यांनी यापूर्वीच सांगितले आहे.