सांगली, दि. १० (पीसीबी) – राज्यातील पूरस्थितीचे राजकारण करू नका. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करावी. सरकारच्या उणिवा दाखवून द्या पण राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांना केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज ( शनिवारी) सांगलीमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त भागात केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली.
मुसळधार पाऊस, कोयनेतील विसर्गामुळे पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली. सांगली आणि कोल्हापूरमधील जनजीवन पूर्ववत करण्यावर सध्या सरकारने भर दिला आहे. आपल्याला राजकारण करण्यासाठी बराच वेळ आहे. सध्या राजकारण करण्याची ही योग्य वेळ नव्हे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.