कोलकाता, दि. १० (पीसीबी) – बॅलेट बॉक्स वापरल्या जाणाऱ्या काळात आम्ही परत जाणार नाही. मतपत्रिका हा भूतकाळ आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या जागी बॅलेट बॉक्स आणला जाणार नाही, असे स्पष्टपणे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.
आयुक्त सुनील अरोरा दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. कोलकाता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, बॅलेट बॉक्स परत आणण्याचा कोणताही विचार नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधकांकडून ईव्हीएम मशिन सदोष असल्याचा आरोप करत पुन्हा बॅलेट बॉक्स आणण्याची मागणी केली जात आहे. परंतु ही मागणी आयुक्त सुनील अरोरा यांनी फेटाळून लावली आहे.