‘अमित शाह यांच्या नादाला लागू नको’ ट्रोल करणाऱ्याला अनुरागने सणसणीत उत्तर दिले

0
649

महाराष्ट्र, दि.१८ (पीसीबी) – सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरून देशभरात गदारोळ सुरू आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन आणि त्यानंतर करण्यात आलेल्या लाठीमारानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटली. यावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी भूमिका मांडली आहे. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही सरकारवर टीका केली होती. त्यावरून ट्रोल करणाऱ्याला अनुरागने सणसणीत उत्तर दिले आहे.