मुंबई, दि. ६ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फुट पाडणारी अनाजी पंतांसारख्या एका प्रवृत्तीला बळी पडून उदयनराजे भोसले यांनी पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना मुंडे म्हणाले की, जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांना काय असे आमिष दाखवले गेले किंवा त्यांच्याकडून काय असे चुकले, यामुळे त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला, याची कल्पना मला नाही. कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली त्यांना कोणत्याही परिस्थितीत याच मातीत गाढायचं असा पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही निर्णय केला आहे.
लोकांना आता विकासाचे राजकारण हवे आहे. या मतदारसंघात विकास झाला नाही. मतातून निवडून आलेले नेतृत्व निष्क्रिय आहे, ही भावना जनतेतून दिसत आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाचा, विचारांचा वारसरदार, तसेच त्यांचा या मातीप्रती जी स्वप्न होती ती पूर्ण करणारा वारसदार आता नक्कीतच ठरणार आहे, असेही ते म्हणाले.