अजून मी म्हातारा झालेलो नाही – शरद पवार

0
741

इस्लामपूर, दि. ११ (पीसीबी) – अजून मी म्हातारा झालेलो नाही,  माझी चिंता करू नका. मी नव्या उमेदीने कामाला लागलो आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष येथील पुरग्रस्तांना धीर दिला.  

पवार यांनी  वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष गावास भेट देवून पूरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, युवा नेते रोहित पवार उपस्थित होते.

पवार म्हणाले की, २००५ साली आपल्या भागात महापूर आला होता, त्यावेळी राज्यात व केंद्रात आपले सरकार होते. आपण पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली होती. आता आपले सरकार नाही. मात्र काळजी करू नका. अजून माझे केंद्रात, राज्यात ऐकले जाते. सर्व काही ठीक होईल, असा धीर त्यांनी पूरग्रस्तांना दिला.