विधानसभा निवडणूक पूरस्थितीमुळे पुढे ढकलावी-राज ठाकरेंची मागणी

0
358

मुंबई, दि. १० (पीसीबी) – गेल्या पाच सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. मात्र राज्य सरकारतर्फे अद्यापही कोणतीच ठोस पाऊले उचलण्यात आली नाही . आताही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे . हे पाहता भाजपाला सत्तेचा माज आला असे दिसते .

राजकारण एके राजकारण करत बसायचे हेच या सरकारचे काम आहे. जी भीषण स्थिती आहे त्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.तसेच आपण यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.