मुंबई,दि.६(पीसीबी) – हे खरच सरकार नाही CIRCUS आहे!!, अश्या शब्दात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आणि त्यामुळे महाविकास आघाडीत दिसून आलेल्या अमन्वयावरून नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय?? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते??मात्र कांग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई?? हे खरच सरकार नाही CIRCUS आहे!!” असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय??
DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते??मात्र कांग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई??हे खरच सरकार नाही CIRCUS आहे!!
— nitesh rane (@NiteshNRane) July 5, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न सांगता 2 जुलै रोजी मुंबईमधल्या 10 पोलिस उपायुक्तांच्या करण्यात आलेल्या बदल्या रविवारी गृह विभागाने तडकाफडकी रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गृह विभागाने या बदल्या रद्द केल्या, असं म्हटलं जात आहे.