सांगली, दि. ४ (पीसीबी) – सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसला नाकारल्याचे दिसून आले आहे. मात्र, काँग्रेसने ईव्हीएमवर शंका घेतली आहे. हा प्रकार म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असा आहे, असा खोचक टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला लगावला . जळगाव आणि सांगली महापालिकांमध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.