मोदी सरकारकडून पी. चिदंबरम यांचे चारित्र्यहनन सुरु – राहुल गांधी

0
471

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) –  मोदी सरकारकडून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चारित्र्यहनन सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. चिदंबरम यांच्या अटकेसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे प्रयत्न सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ट्विटद्वारे त्यांनी हा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले की, “मोदी सरकार अमंलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय आणि विविध कणाहीन माध्यमांचा वापर करुन चिदंबरम यांचे चारित्र्यहनन करण्यात येत आहे. अशा प्रकारे सरकारकडून लज्जास्पदरित्या सत्तेचा गैरवापर करण्याचा मी तीव्र निषेध करतो.”