लोकसभा निवडणुकीची आज घोषणा; निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद

0
683

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज (रविवार) संध्याकाळी जाहीर होणार आहे.  संध्याकाळी ५ वाजता निवडणूक आयोग दिल्लीत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  निवडणूक आयोग या  पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा करणार आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे.

लोकसभा निवडणुका नियोजित वेळेनुसारच होणार, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी काही दिवसांपूर्वीच  सांगितले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यावर आयोगाने वेळेवरच निवडणूक होईल, असे  स्पष्टीकरण दिले होते.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या नवीन अधिसूचनेनुसार उमेदवारांना त्यांच्या परदेशातील मालमत्तेचीही माहिती द्यावी लागणार आहे. आयटी विभाग यामध्ये लक्ष घालणार आहे. तसेच  माहितीमध्ये विसंगती आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.