राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी; भाजप खासदार लोकसभा आणि राज्यसभेत आक्रमक

0
566

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – राफेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप करून दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. लोकसभ आणि राज्यसभेत भाजपच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. भाजपच्या या आक्रमकतेमुळे काँग्रेस आणि राहुल गांधींची पंचाईत झाली आहे.