नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने गुजरातमध्ये सत्तेत असणारी भाजपा असाच निर्णय पाटीदार समाजाबद्दल का घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. कालच महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर हार्दिकने हे मत मांडले आहे.