महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेली हिंदी भाषा परीक्षा कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जवळपास ५० वर्षांपासून लागू असलेल्या नियमालाही पूर्णविराम मिळाला आहे. या नियमानुसार काही सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते.
महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! हिंदी भाषेची अनिवार्य परीक्षा रद्द करण्यात आली असून, जवळपास ५० वर्षांपासून लागू असलेला नियमही आता इतिहासजमा झाला आहे.

