बलुचिस्तानमध्ये मोठी हिंसक चढाओढ; BLA चा दावा समन्वित हल्ल्यांत २०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी ठार

0
2

दि.०२(पीसीबी)-बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या बंदी घातलेल्या विभाजनवादी संघटनेने ‘ऑपरेशन हिरोफ फेज–II’ अंतर्गत केलेल्या व्यापक आणि समन्वित हल्ल्यांत पाकिस्तानच्या २०० हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. हे हल्ले तब्बल ४० तासांहून अधिक काळ बलुचिस्तानमधील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू होते.

BLA च्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान लष्कर, पोलीस आणि फ्रंटियर कॉर्प्समधील २०० पेक्षा जास्त जवान ठार झाले असून किमान १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत प्रथमच मोठ्या प्रमाणावर महिला ‘फिदायीन’ आत्मघाती हल्लेखोरांचा वापर करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. याशिवाय, स्फोटकांच्या (IED) साहाय्यानेही हल्ले करण्यात आले.

ही कारवाई खारान, मस्तुंग, तुंप, पास्नी यांसह अनेक भागांत पसरली असून, इतर ठिकाणीही संघर्ष सुरू असल्याचे BLA ने म्हटले आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये दोन महिला आत्मघाती हल्लेखोर दिसत असून, त्यापैकी एक २४ वर्षीय आसिफा मेंगल असल्याचे सांगण्यात आले आहे. ती मजीद ब्रिगेड या BLA च्या विशेष आत्मघाती पथकात सहभागी होती.

या हल्ल्यांनंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिहल्ले सुरू केले. अधिकृत माहितीनुसार, सुरक्षा दलांनी किमान १४५ दहशतवाद्यांना ठार केले आहे. मात्र, या हिंसाचारात ५ महिलांसह ३१ नागरिक आणि १७ सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

हल्लेखोरांनी सामान्य नागरिकांच्या वेशात रुग्णालये, शाळा, बँका आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश करून गोळीबार केला. काही ठिकाणी नागरिकांना मानवी ढाल म्हणून वापरण्यात आल्याचेही समोर आले आहे.अलिकडच्या काळात बलुचिस्तानमधील बंडखोरी तीव्र झाली असून, अधिकाऱ्यांच्या मते ही कारवाई अत्यंत समन्वित आणि आक्रमक स्वरूपाची हो