राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम; वृक्षारोपण संपन्न

0
12

पिंपरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निगडीतील अंकुश चौक येथे भव्य वृक्षारोपणाचा एक प्रेरणादायी उपक्रम पार पाडण्यात आला.

            पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निगडीतील अंकुश चौक येथे वृक्षारोपणाचा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पिंपळ, वड, चिंच यांसारख्या देशी व पर्यावरणपूरक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या झाडांचे औषधी व पर्यावरणीय दृष्टीने खूप महत्त्व आहे. या झाडांनी फक्त पर्यावरणच नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांचे आरोग्य सुद्धा सुरक्षित राहील. वृक्षारोपण कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक तसेच युवा वर्गाच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मनसे शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री. सचिन चिखले यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, वृक्ष म्हणजे प्राणवायूचे स्रोत. पिंपळ, वड, चिंच यांसारखी देशी झाडे अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार करतात. त्याचबरोबर ही झाडे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, उष्णता कमी करतात, पाण्याचे स्रोत टिकवतात आणि जैवविविधतेला आश्रय देतात. कोरोना काळाने आपल्याला शिकवले की आरोग्य व्यवस्थेबरोबरच पर्यावरण व्यवस्थाही बळकट करावी लागते. आणि त्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. "एक झाड लावा, हजार श्वास वाचवा" ही आजच्या काळातील खरी गरज आहे. प्रत्येकाने दरवर्षी एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे, हीच कोरोना काळाने दिलेली शिकवण आहे.

        दरम्यान, या कार्यक्रमात निगडी प्रभागातील अनेक मान्यवर व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. उपस्थितांमध्ये भानुदास खाडे, भारत बनसोडे, दादा सातपुते, केरबा सोनवने, प्रबुद्ध कांबळे, गणेश वाघमारे, विकी कांबळे, जय सकट, सागर बहुले, विष्णू लोखंडे, सचिन पायाळ, मंगेश जाधव, पी. बी. चिचोळकर, नारायण पठारे, अबु मंडलिक, विठ्ठल रोमाडी, नियाजभाई शेख, शेहनाज शेख, राणी शेख, कुतबुद्दीन होबळे, राजुभाई पोथीवाल, उमेश शिंगारे, राहुल कंठाळे, रमेश तळेकर, स्वप्निल प्रभाणे, श्रवण गोहेल, पोलीस मित्र देवजी सापारीया यांचा विशेष सहभाग होता. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने कार्यक्रमात हजेरी लावली आणि पर्यावरण रक्षणाच्या या पवित्र उपक्रमात आपले योगदान दिले. वृक्ष म्हणजेच जीवन या भावनेतून प्रेरित होऊन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करून पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलली जातील, असा निर्धार यावेळी करण्यात आला.