पिंपरी, दि . ७ ( पीसीबी ) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानातील प्रत्येक कलम हे मानवी मूल्यांचे रक्षण करणारे आहे, “आम्ही भारताचे लोक” या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शब्दातच देशाला एकता,अखंडता व समानतेत गुंफले आहे. प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे,याशिवाय आपले मत व्यक्त करण्याचा, आपल्या मनाप्रमाणे नोकरी,उद्योग,व्यवसाय करण्याचाही अधिकार दिलेला आहे. आपल्या संविधानामुळे देशात प्रत्येक जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. याच एकतेच्या जोरावर भारताने विविध क्षेत्रात प्रगती करत जागतिक स्तरावर आपल्या देशाचे स्थान उंचावले आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन उद्देशिका वितरणाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे, त्यामुळे शहरातील प्रत्येकाला भारतीय संविधानाचा अर्थ समजण्यास निश्चितच मदत होईल असे मत फर्ग्युसन महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी मांडले.
पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे ‘भारतीय संविधानाचा गौरव’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.प्रकाश पवार हे बोलत होते.
दरम्यान महापालिकेच्या वतीने भारतीय संविधान उद्देशिका शहयातील नागरिकांना घरोघरी वितरण करण्याच्या उपक्रमाचा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला आणि उपस्थित नागरिकांना उद्देशिकाचे वितरण करण्यात आले यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, समाज विकास विभागाच्या संतोषी चोरगे, माजी शहर अभियंता महावीर कांबळे, माजी कार्यकारी अभियंता वसंत साळवी, महापालिकेचे निवृत्त अधिकारी अनिल सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रोकडे, धुराजी शिंदे, राजेंद्र साळवे, संतोष जोगदंड, मनोज गजभार,तुकाराम गायकवाड, दीपक म्हस्के, सुरेश रोकडे, नरेंद्र बनसोडे, कविता म्हस्के , प्रमिला ठोंबरे, मंजू जैस्वाल यान यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.डॉ.प्रकाश पवार म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून प्रत्येक भारतीयांना खरे स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. याच संविधानाने देशातील सर्व नागरिकांना सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा, समानतेचा, स्वतंत्र विचार करण्याचा आणि आपल्या मुलभूत हक्काची जपवणूक करण्याचा अधिकार दिला आहे. भारतीय राज्य घटनेतीलअनेक कलम हे भारतीय नागरिकांना गुण्यागोविंदाने जगण्यासोबत आवडता व्यवसाय, उद्योग करण्याचा अधिकार देतात. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच संविधान निर्मितीच्या माध्यमातून देशातील सामाजिक विषमता नष्ट करत सामाजिक क्रांती घडवून आणली आहे असे देखील ते म्हणाले.
तसेच संविधानातील कलमानुसार महानगरपालिकेलाही विविध कामे देण्यात आली आहेत. त्याचे पालन करत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करत आहे. त्यांना आवश्यक त्या सुविधा देत आहे. नागरिकांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांमुळे महानगरपालिकेचा नावलौकिक वाढला असल्याचे मत देखील पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन व आभार