ह्दयद्रावक: मुंबईत कारमध्ये गुदमरुन दोघा मित्रांचा मृत्यू

0
455

मुंबई, दि. २ (पीसीबी) – पावसामुळे मालाड सबवेमध्ये पाणी भरल्याने स्कॉर्पिओ कारमध्ये अडकलेल्या दोघा मित्रांचा गुदमरुन दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.१) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

इरफान खान (वय ३८) आणि गुलशाद शेख (वय ४०) अशी मृत दोघा मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मालाड भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे मालाड सबवेमध्ये पाणी भरलेगेले. यावेळी त्या मार्गावरुन इरफान आणि गुलशाद हे दोघे त्याच्या स्कॉर्पिओ कार (क्र.एमएच/०१/बीए/२१६९) मधून जात होते. इतक्यात कार त्या ठिकाणी अडकली आणि लॉक झाली. यामुळे इरफान आणि गुलशाद या दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.