हिंमत असेल तर, मोदींनी हेडगेवार, गोळवलकर, गोडसेंच्या नावाने मते मागून दाखवावीत – जितेंद्र आव्हाड

0
642

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हिंमत असेल, तर त्यांनी हेडगेवार, गोळवलकर, नथुराम गोडसे यांच्या नावाने मते मागून दाखवावीत, असे प्रतिआव्हान राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी यांना दिले आहे. नाहीतरी तुमचे विचार त्यांचेच आहेत, असा टोलाही आव्हाड यांनी मोदींना लगावला आहे.

हिंमत असेल तर काँग्रेसने राजीव गांधींच्या नावे निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान  पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना केले होते. या आव्हानाला  आव्हाड  यांनी  प्रतिआव्हान देत मोदींवर ट्विट करून पटलवार केला आहे.आम्ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या नावाने मतं मागू आणि मागणारच!, असेही जितेंद्र आव्हाड यांनी   म्हटले आहे.

दरम्यान,  मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचार नंबर १ अशी  टीका केली होती. त्यांची अखेर भ्रष्टाचाराने झाली, असे सांगून काँग्रेस मध्ये हिम्मत असेल तर त्यांनी राजीव गांधी यांच्या नावाने निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान केले होते. यावर काँग्रेससह  विरोधकांचा  चांगलाच तिळपापड झाला असून काँग्रेस नेत्याकडून मोदींवर टीकेची झोड उठवली जात आहे.