साध्वी प्रज्ञासिंगने मसूदला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईक करावा लागला नसता – दिग्विजय सिंग

0
702

भोपाळ, दि. २८ (पीसीबी) – साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला शाप दिला असता, तर भारताला सर्जिकल स्ट्राईक करावाच लागला नसता, अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत सिंह बोलत होते. शहीद हेमंत करकरे यांना शाप दिल्यानेच ते दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी एका प्रचार सभेत केले होते.  या विधानाचा दिग्विजय सिंग यांनी खरपूस समाचार घेतला.

पंतप्रधान मोदी म्हणतात की दहशतवादी पाताळात जरी लपले, तरी त्यांना शोधून काढून कंठस्नान घालण्यात येईल. मग पुलवामा, पठाणकोट आणि उरी हे ३ दहशतवादी हल्ले झाले, तेव्हा ते कुठे होते? असे मला विचारायचे आहे. तसेच भारताला अजूनही अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांपासून सुटका का मिळत नाही?, असा सवाल सिंह यांनी केला.