सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही – आदित्य ठाकरे

0
458

बीड, दि. ४ (पीसीबी) –  सकाळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा परभणीहुन बीड जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेळी त्यांनी बीडमध्ये नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलताना शेतकऱ्यांविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही अस विधान केले आहे.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी ‘मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. जो कर्जमुक्त असेल, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त सुशिक्षित आणि सुरक्षित असेल. शेतकरी बांधवानो आशीर्वाद देणार की नाही असे अवाहन करत तुमचा आशीर्वादच नवा महाराष्ट्र घडवील. सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही. असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री पदाविषयी बोलताना ठाकरे यांनी ‘जे काय मिळवायचं ते मिळेल. मला मात्र तुमची सेवा करायची आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव मिळत राहावं. महाराष्ट्रात बऱ्याच समस्या आहेत, शेतकरी मला भेटून त्यांची निवेदने देत आहेत यात कर्जमुक्ती, पीक विमा, अडचणी सांगत आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास मी कायम ठेवेल. तसेच जनआशीर्वाद यात्रा ही मत मागण्यासाठी नाही. तर आशीर्वाद आणि प्रेम मागण्यासाठी आहे असंही आदित्य ठाकरे म्हणाले.