सरकारला प्रश्न विचारायला का घाबरायचं?- अनुराग कश्यप

0
380

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – लोकशाही तुम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क देते आणि सरकारला प्रश्न विचारायला का घाबरायचं असा सवाल दिग्दर्शक अनुराग कश्यपने केला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनुरागने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत एक ट्विट केलं होतं. माझ्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या तुमच्या समर्थकांना कशाप्रकारे तोंड द्यायचं असा प्रश्न त्याने मोदींना केला होता. धमकीविरोधात पोलिसांकडे जाण्याऐवजी थेट मोदींना टॅग करून ट्विट केल्याबद्दल अनेकांनी अनुरागवर टीका केली होती.