“सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून कसं राहणार? आवाज उठवायलाच हवा”

0
570

मुंबई,दि.१२(पीसीबी) – सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून कसं राहणार? आवाज उठवायलाच हवा, अशी एक फेसबुक करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

जळगाव येथे रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 82 वर्षीय करोनाबाधित वृद्धेचा मृतदेह सहा दिवसांनी रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आला. या घटनेवर चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून विचार केला तर या गोष्टीबद्दल प्रचंड दु:ख आणि संताप वाटतो, ज्या सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण कसं शांत बसून राहणार? आवाज उठवायलाच हवा, असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मी भारतीय जनता महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या मुलाच्या दुःखात सहभागी आहे असंही ते म्हणाले आहेत.