यवतमाळ , दि. ४ (पीसीबी) – निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले झाले आहे. आमची सत्ता आल्यास त्यांनादेखील जेलची हवा खायला पाठवू, असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप, काँग्रेससह निवडणूक आयोगाचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना सत्ता देऊ नका. डाव्यांच्या आणि वंचित आघाडीच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आम्हाल सत्ता मिळा ल्यास केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारची असेल. तसेच आरएसएस जेलमध्ये असेल. पुलवामाची घटना ही ‘मॅच फिक्सिंग’ असून यावर काही बोलले की निवडणूक आयोग बंदी घालते, असे ते म्हणाले.