पुणे, दि. २ (पीसीबी) – मोदी सरकारने शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी साधूंना दरमहा ५ हजार देण्याची मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्रातील तरुण आता मला म्हणतात की, शेतकरी होऊन पाचशे रुपये घेण्यापेक्षा साधू होऊन ५ हजार घेईन , असे पवार यांनी आज (शनिवार) येथे सांगितले.