शेतकरी होऊन ५०० रुपये घेण्यापेक्षा साधू होऊन ५ हजार घेईन – अजित पवार

0
362

पुणे, दि. २ (पीसीबी) –  मोदी सरकारने शेतकऱ्यांना दरमहा  पाचशे रुपये देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी साधूंना दरमहा ५ हजार देण्याची  मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी केली आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्रातील तरुण आता मला म्हणतात की, शेतकरी होऊन पाचशे रुपये घेण्यापेक्षा साधू होऊन ५ हजार घेईन , असे  पवार यांनी आज (शनिवार) येथे सांगितले.