“शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांच्या खिश्यात पैसे द्या”

0
393

नवी दिल्ली, दि.१६(पीसीबी) – शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांच्या खिश्यात पैसे द्या, असं काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी म्हणाले आहेत.

शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे, त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही, असं मत स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी व्हीडिओच्या रूपात संवाद साधला. शेतकरी, मजुर, कष्टकरी हा अर्थकारणाचा पाया आहे. त्यांना सरकारने मदत करायलाच हवी. नुसतं पॅकेज जाहीर करून चाणार नाही तर त्यांच्या खिश्यात पैसे जायला हवेत, असं ते म्हणाले. लोकांच्या खिश्यात जर पैसे नसतील तर लोक काय खाणार? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारने सावकाराचं काम करू नये, अशी टीका केली.

दरम्यान भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असं राहुल गांधी म्हणाले.