औरंगाबाद,दि.२०(पीसीबी) – युती असो की महाआघाडी शिवसेनेशिवाय राज्यात सरकार स्थापन करणं अशक्य आहे. त्यामुळे आमचाच मुख्यमंत्री होणार आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. ते औरंगाबाद येथे बोलत होते.
राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांसाठी ठिकठिकाणी मदत केंद्र उभारण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
२०१६ मध्ये झालेल्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांना फायदा व्हावा यासाठी मदत जाहीर करणार आहे. येत्या पाच वर्षांत शिवसेना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे पक्के, असंही दिवाकर रावते म्हणाले आहेत.