शिवसेनेचे नेते गजनी बनलेत – जीवीएल नरसिम्हा राव

0
514

नवी दिल्ली,दि.१९(पीसीबी) – शिवसेनेचे नेते सध्या गजनी बनले आहेत. दोन दिवसांपूर्वी काही वेगळं बोलतात आणि आज काही वेगळं बोलतात, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव यांनी सामनातील अग्रलेखातून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं सरकार देण्याचं वचन दिलं होतं. जर कोणी विश्वासघात केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे. तसेच जो पक्ष राजकारणासाठी सत्तेच्या मागे पळत असतो ते कधी ना कधी पक्ष विखुरता दिसतो, असंही जीवीएल नरसिम्हा राव यांनी म्हटलं आहे.

आम्ही सामना वाचत नाही, जे त्यात लिखाण करतात तेच सामना वाचतात, ज्यांना बाहेर जायचं होतं ते स्वत: बाहेर गेले आहेत, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा राव यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे.