विधानसभा निवडणुकीत रिपाईचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
415

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी आमची आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

भाजपचे सरकार आल्यानंतर संविधान बदलले जाईल असा आरोप विरोधक करत होते. माञ तसे काही झालेले नाही आणि होणारही नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

कलम ३७० जेंव्हा संविधानात समाविष्ट करायचे होते तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला होता. आता ७० वर्षांनी कलम ३७० रद्द केल्या मुळे त्या काळात या ३७० कलम ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जो विरोध केला होता त्या विरोधाला न्याय मिळाला आहे असेही फडणवीस म्हणाले.

रिपाईचे नेते रामदास आठवले म्हणाले, विधानसभा निकडणुकीसाठी रिपाईला १० जागा मिळाव्यात अशी मागणी केली. भाजप शिवसेना रिपाई महायुती एकत्र लढल्यास विधानसभा निवडणुकीत महायुती ला २४० जागा जिंकता येतील असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.