‘विधवा महिलांना (कोविड-१९) योजनेचा लाभ मिळणेकामी ५० वर्षे वयाची अट शिथील करावी’: उपमहापौर हिराबाई घुले यांची आयुक्तांकडे मागणी

0
482

पिंपरी, दि.०७(पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत कोरोना काळात ज्या महिलांचे पती कोरोना संसर्गाने बाधित होऊन कोरोना आजाराने मृत्यू पावले आहेत अशा विधवा महिलांना महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत र.रु२५,०००/- चे अर्थसहाय्य मंजुर केले जात आहेसदर योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय ५० वर्षे पर्यंत असावे अशी अट नमुद केलेली परंतु घरातील कर्ता व्यक्ती मयत झाल्यानंतर कुटूंबाची वाताहत होते, ही बाब नाकारता येत नाही. तसेच ज्या महिलांचे पती हे कोरोना संसर्गाने मृत्यु पावले आहेत परंतु कांही विधवा महिलांचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त आहे अशा सर्व विधवा महिलांना सदर योजनेचा लाभ मिळणेकामी ५० वर्षे वयाची अट शिथील करणे गरजेचे आहे. 

तरी सदरची मागणी रास्त असून सदर योजने अंतर्गत जास्तीत जास्त विधवा महिलांना आर्थिक सहाय्य लाभल्याने त्यांच्या कुटुंबास हातभार लागणार आहे. असे उपमहापौर (नानी) घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.