विजेचा धक्का लागून दोघा चिमुकल्या बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू

0
390

अहमदनगर, दि. २८ (पीसीबी) – घराच्या गच्चीवर खेळत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने दोघा चिमुकल्या बहिण-भावाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना कर्जतच्या गवंडी गल्लीत घडली.

आयर्न विनय कुमार निषाद (वय ७ वर्ष) आणि जानवी विनय कुमार निषाद (वय ३) असे मयत बहिण-भावाची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निषाद दाम्पत्य हे उत्तरप्रदेशातून कर्जतमध्ये आलेले असून मोलमजुरी काम करतात. त्यांना आयर्न आणि जानवी हे दोन मुले होती. हे दोघे सोमवारी सायंकाळी घराच्या गच्चीवर खेळायला गेले होते. त्यांची आई घरात स्वयंपाक करीत होती, तर वडील रंगकामासाठी गेले होते. खेळाता खेळता आयर्न आणि जानवीचा गच्चीवरील विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने धक्का बसला. विजेच्या धक्क्याने दोघेही शेजारील घराच्या पत्र्याच्या छतावर फेकले गेले. शेजारच्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिकडे धाव घेतली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता.